पोस्ट्स

तारकमंत्र

 https://youtu.be/L8PM7aPzWhw?feature=shared निशंक हो निर्भय हो मना रे । प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे । अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी  ।।१।। जिथे स्वामीपाय तिथे न्यून्य काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय। आज्ञेवीना काळ ना नेई त्याला, परलोकी ही ना भीती तयाला   ।।२।। उगाची भितोसी भय हे पळु दे, जवळी उभी स्वामीशक्ती कळू दे । जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा   ।।३।। खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होसी त्याविण तू स्वामिभक्त । कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात   ।।४।। विभूति नमननाम ध्यानादी तीर्थ, स्वामीच या पंचप्राणामृतात । हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती, न सोडी तया, स्वामी ज्या घेती हाती  ।।५।। श्री स्वामी समर्थ चरणारविंदार्पणमस्तू

गोळाबेरीज २०२३

इमेज
 खूप विचार करण्याची मला लहानपणापासूनच सवय आहे. एखादा चुकीचा जरी वागला किंवा वागली तरी मी आधी त्याच्या भूमिकेत जाऊन विचार करते की हा किंवा ही असं का बरं बोलले  वागले असतील. कारण मुळात मी फटकळ म्हणूनच प्रसिद्ध. तरी मी आता बरीच मवाळ झाले. कदाचित आता काहीही झालं तरी मुंबईत रहावं लागणार हे लक्षात आल्यानं गेल्या ७-८ वर्षात मी अशी झाले आहे कदाचित. १८ वर्षांपूर्वी मुंबईत आले तेंव्हा कुणाचीही भिडभाड न ठेवता तोंडावर वाजवून येणारी मी, आता गेल्या काही वर्षात तोंडावरची माशीही न हलल्याप्रमाणे चेहेरा स्थिर ठेऊन निमूट सहन करते. म्हणतात ना घर पहावं बांधून... त्यातली गत झालीय. पण अध्यात्म तरी दुसरं काय आहे? 'मी जे जगतेय ते जगणं ही नियतीची इच्छा आहे. आणि यातून परमार्थ शोधणे हे जीवनाचे मर्म आहे.' पण हे जर समजलं तर जगही जिंकणं कठीण नाही पण नाही जमलं तर मात्र जग तुमच्यावर हसल्याशिवाय राहणार नाही.  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात देव आपल्याला सगळे रंग दाखवतो. मग ते कधी निसर्गाचे असतात, कधी नात्यातले असतात, कधी मित्र-मैत्रिणींचे असतात, तर कधी सोबत काम करणाऱ्यांचे असतात. या सगळ्या रंगात आपणही अनेकद...

अटल बिहारी वाजपेयी १६ ऑगस्ट २०१८ रोजीची कविता

इमेज
अटल शब्द अन् अटल बुद्धीचा खजिना होता व्यासंगाचा देश कार्य अन् जन कल्याणा झिजवल्यास तू आपुल्या वहाणा गर्व  कशाचा, प्रौढी कसली अढळ राही तव अटलशी मूर्ती कधी मनोहर, कधी खोलवर कधी पुराणा रमसी कवीवर कधी अध्यात्मा, कधी समाजा कधी बोधाने प्रेरीत करिसी जनउद्धारा तव अती प्रिती स्वयंस्फूर्तीने पाही जन रिती वाङनिश्चया तू नाकारसी देशप्रेम वधू तू स्वीकारसी वक्ता म्हणूनी ते नामांकित लेखन तुमचे करते पुलकित कवित्व तुमचे स्फूर्तीदायक सरस्वतीचा तुम्हा आशीर्वच! राजकीय पटलावर वावर अनेक मित्र अन् शत्रू टिचभर राजा म्हणूनी मुकुट शिरावर मिरवी तेंव्हा अससी स्थिरचर ब्रह्मचारी परी कर्म पुजारी असा जीवात्मा होणे नाही असा जीवात्मा होणे नाही असा जीवात्मा होणे नाही ©प्रज्ञा कुलकर्णी- हस्तक

सद्गुरू स्तवन, दासबोध🙏

  II  दासबोध दशक १ - स्तवननाम      समास ४ - सद्गुरुस्तवन  II ॥श्रीराम॥ आतां सद्गुरु वर्णवेना | जेथें माया स्पर्शों सकेना | तें स्वरूप मज अज्ञाना | काये कळें ||१|| नकळे नकळे नेति नेति | ऐसें बोलतसे श्रुती | तेथें मज मूर्खाची मती | पवाडेल कोठें ||२|| मज नकळे हा विचारु | दुऱ्हूनि माझा नम- स्कारु | गुरुदेवा पैलपारु | पाववीं मज ||३|| होती स्तवनाची दुराशा | तुटला मायेचा भर्वसा | आतां असाल तैसे असा | सद्‍गुरु  स्वामी  ||४|| मायेच्या बळें करीन स्तवन | ऐसें वांछित होतें मन | माया जाली लज्यायमान | काय करूं ||५|| नातुडे मुख्य परमात्मा | म्हणौनी करावी लागे प्रतिमा | तैसा  मायायोगें  महिमा  |  वर्णीन  सद्‍गुरूचा  ||६|| आपल्या भावासारिखा मनीं | देव आठवावा ध्यानीं | तैसा  सद्‍गुरु  हा  स्तवनीं  |  स्तऊं  आतां  ||७|| जय जयाजि  सद्‍गुरुराजा | विश्वंभरा  विश्व- बीजा | परमपुरुषा मोक्षध्वजा | दीनबंधु ||८|| तुझीयेन अभयंकरें | अनावर माया हे वोसरे | जैसें  सूर्यप्रकाशें  अंधारें...

१० मुद्दे

  ऐकण्या-बोलण्या संबंधी १० मुद्दे लक्षात घ्या- जग जिंकाल! श्रवण हा सर्वात उत्तम गुण आहे, त्यामुळे कमी बोला आणि जास्त ऐका बोलताना विचार करून बोला, बोलून विचारात पडू नका फक्त फायदा आहे अशांशीच बोलू नका, सर्वांशी संवाद ठेवा कुणालाच कमी लेखू नका, तुम्हाला कोण, कधी, कसा कामी येईल सांगता येत नाही पण म्हणून विनाकारण कुणाशीही गप्पा छाटत बसू नका जन्माला आलेला प्रत्येकजण ईश्वराच्या इच्छेनेच जन्मलाय, आपल्याला कुणाला कमी लेखण्याचा अधिकार नाही. हे ध्यानात असू द्या पण एखादी व्यक्ती तुमच्याशी नीट वागत नाही म्हणून  तुम्हीह त्यांच्याशी तसंच वागू नका. अन्यथा तुम्ही व ती व्यक्ती एकाच तराजूत मोजले जाल व्यर्थ बडबडण्यात वेळ फुकट घालवू नका शक्यतो कामाचे व मोजकेच बोला वर्तन असं ठेवा जे लहानांपासून थोरांना आदर्शवत वाटेल विनाकारण इकडचा राग तिकडे काढू नका 

पण तू मुद्याचं बोल!

दुनिया आहे गोल, इथे होतात सगळे झोल पण तू मुद्याचं बोल, आता मुद्याचं बोल नवजात बालकाला सुद्धा नाही गोड बोल जन्मताच रुग्णालयी कसा काय होतो झोल पण तू मुद्याचं बोल, आता मुद्याचं बोल बाळ झाले जरा मोठे त्याला देतो लस डोस पण कारभार सारा काळा, खाजगी रुग्णालयी झोल पण तू मुद्याचं बोल, आता मुद्याचं बोल घालू शाळेमध्ये आता शिकवू मराठीचे बोल पण राज्य मराठी तरी शाळेलाच कैसी ओल पण तू मुद्याचं बोल, आता मुद्याचं बोल देऊ धडे शहाण्याचे आणि शिकवू चांगला रोल सांगू आयुष्याचेचे वर्म, देऊ जीवनाचे मोल पण तू मुद्याचं बोल, आता मुद्याचं बोल ©प्रज्ञा कुलकर्णी हस्तक

मंगलाष्टका

स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं, मोरेश्वरं सिद्धिदं । बल्लाळो मुरुडं विनायकमहं, चिन्तामणि स्थेवरं || लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरदं, विघ्नेश्वरम् ओज़रम् | ग्रामे रांजण संस्थितम् गणपतिः, कुर्यात् सदा मङ्गलं || १ || गंगा सिंधु सरस्वती च यमुना, गोदावरी नर्मदा । कावेरी शरयू महेंद्रतनया शर्मण्वती वेदिका ।। क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी, ख्याता गया गंडकी । पूर्णा पूर्ण जलैः समुद्र सरिता, कुर्यातसदा मंगलम ।। २ ।। लक्ष्मी: कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरिश्चंद्रमा: । गाव: कामदुधाः सुरेश्वर गजो, रंभादिदेवांगनाः ।। अश्वः सप्त मुखोविषम हरिधनुं, शंखोमृतम चांबुधे । रत्नानीह चतुर्दश प्रतिदीनम, कुर्वंतु वोमंगलम ।। ३ ।। राजा भीमक रुख्मिणीस नयनी, देखोनी चिंता करी । ही कन्या सगुणा वरा नृपवरा, कवणासि म्यां देईजे ।। आतां एक विचार कृष्ण नवरा, त्यासी समर्पू म्हणे । रुख्मी पुत्र वडील त्यासि पुसणे, कुर्यात सदा मंगलम ।। ४ ।। लक्ष्मीः कौस्तुभ पांचजन्य धनु हे, अंगीकारी श्रीहरी । रंभा कुंजर पारिजातक सुधा, देवेंद्र हे आवरी ।। दैत्यां प्राप्ति सुरा विधू विष हरा, उच्चैःश्रवा भास्करा । धेनुवैद्य वधू वराशि चवदा, कुर्यात सदा...