पोस्ट्स

मे, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

श्री राम आम्हाला देतो।। निखळ आनंद। समाधान। संतुष्टी

इमेज
श्री राम आम्हाला देतो।। प्रत्येक मनुष्य आपल्या कुवती प्रमाणे, म्हणजे (शारीरिक,आर्थिक, मानसिक, वैचारीक इ. इ.) कार्य करत असतो. पण खरच तो जे कार्य करतो त्यात तो समाधानी असतो का..? आणि असला तरी किती समाधानी असतो...? समाधानाची प्रत्येकाची व्याख्या वेगळी मात्र तरीही एके ठिकाणी कुठेतरी ती समानतेवर येतेच. आता माझ्याच बाबतीत सांगायचं झालं तर, काम करताना मनासारखं काम झालं की मला फार बरं वाटतं, पण म्हणून मी समाधानी असतेच असं नाही, मात्र तेच मला एखाद्या आजी वा अजोबांनी रस्ता क्रॉस करुन देता आला तरी खूप समाधानी असल्यासारखं वाटतं. मी शाळेत असताना मला शाळा सुटण्याच्या सुमारास एक जख्ख म्हाताऱ्या आजी भेटायच्या पांढऱ्या रंगाची, त्यावर चॉकलेटी किंवा फेन्ट गुलाबी, हिरवी फुलं असलेली साडी नेसलेल्या, वय साधारण 70च्या आसपास, चेहेऱ्यावर वयाची जाणीव करुन देणाऱ्या सुरकुत्या, पांढऱ्या केसांचा छोटासा अंबाडा, उंची जेमतेम चार-साडेचार फूट, हातात काठी आणि छोटीशी पिशवी, त्यात जपाची माळ, फुलं, खडिसाखरेचा छोटा डबा असायचा. आणि त्या नेमक्या कुणाची तरी वाट पाहत उभ्या असायच्या.(अर्थातच क्रॉस करुन देणारं कोणीतरी भेटेल ...

नव्या संसद इमारतीची माहिती थोडक्यात

इमेज
 #CentralVista #संसदेचीनवीइमारत संसदेची नवी इमारत त्रिकोणाकृती आहे. नवी इमारत चार मजली आहे. टाटा प्रोजेक्टस् लिमिटेड मार्फत इमारत बांधली आहे. एचसीपी डिझाईन आणि प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट प्रा.लि. ने  डिझाइन केले आहे. लोकसभा खासदारांसाठी 888 आणि राज्यसभा खासदारांसाठी 384 आसन व्यवस्था करण्यात आलीय. पार्लमेंट हॉलमध्ये एकूण 1 हजार 224 सदस्य एकाच वेळी बसू शकतील अशी क्षमता आहे. भविष्यात दोन्ही सभागृहांची वाढीव संख्या लक्षात घेत ही व्यवस्था केलेली आहे. नव्या संसद इमारत आणि परिसराचं क्षेत्रफळ 64 हजार 500 चौरस मीटर आहे. 16 हजार 921 चौ.मी. अंडरगाऊंड. बांधकामाचा खर्च ९५०कोटींहून वाढून १२०० कोटींपर्यंत गेला, असं सांगतात. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग ही संसदेची नवीन इमारत बांधण्यासाठीची नोडल एजन्सी आहे. भारताचा लोकशाही वारसा सांगणारं ‘संविधान सभागृह’ इथे आहे. संसद सदस्यासाठी लाऊंज सभागृह, ग्रंथालय, अनेक समित्यांच्या खोल्या, भोजनगृह इथे आहे.

आपण खरे अंधश्रद्धाळू

इमेज
आपण खरे अंधश्रद्धाळू आहोत, कारण या देहावर आपला अधिकार आणि सत्ता आहे असं बहुतेक सगळ्यांना वाटतं. पण या देहावरच काय आपल्या चालण्या-बोलण्या-वागण्या-राहण्यातल्या कश्शा कश्शावरच आपला मुळीच अधिकार नाही. कदचित अतिशयोक्ती वाटेल तुम्हाला पण हे सत्य आहे. लहानपणी आपल्या पालकांनी आपल्या पाल्यांना जे काही शिकवले त्यानंतर पुन्हा आपण त्याच चूका करायला फार गेलो नाही. आगीला हात लावू नको ते हाआआआ आहे.. असं म्हणून ते आपल्याला बाजूला करायचे, खोटं बोलू नये, वाईट ऐकू नये या शिकवणीतून आपण मोठे झालो. त्यातील अनेक गोष्टींवर अंधळेपणानं विश्वास ठेवला. का, कारण मोठे सांगतात ते योग्यच... पण अनेकदा चांगलं वागून वाईट अनूभवही आला..  त्यामुळे श्रद्धा-अंधश्रद्धा हा अनुभवाचा भाग आहे. त्याला कोणतीही लेबलं लावून चालत नाही. 

सामर्थ्य आहे चळवळीचे

इमेज
 सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करिल तयांचे। परंतु तेथे भगवंताचे आधिष्ठान पाहिजे।। सामर्थ्याची प्रत्येकाची व्याख्या निरनिराळी. सामर्थ्यातच कर्तृत्व दडलंय, पण त्याचे parameters वेगवेगळे. कुणाला कर्तृत्वाचा अभिमान असेल आणि तसे त्याचे उत्तम कार्य असेल तर त्याची दखल अख्खं जग घेतं. पण एखाद्याला चोऱ्यामाऱ्या करण्यातच कर्तृत्व दडलय असं वाटत असेल तर त्याला सर्वसामान्य, सोडाच साधू संत तरी काय करणार? पण ज्याच्यात सामर्थ्य आहे तो कधीच कुणापुढे हात पसरत नाही एकवेळ पोटाला चिमटा काढून जगेल, पण कुणाला मागणार नाही अगदीच मागायची वेळ आलीच, तर परत करण्याचीही तयारी ठेवण्याच्या विचारांचा असणार ज्याच्या बैठकीतही भगवंतचा विषय असतो, तो अनाठीयी 'विषयांना' दूरच सारतो पण ज्याच्या जगण्यात फक्त 'विषय', त्यांना हे विष आहेय, हे कसे बरे कळावे... म्हणूनच सामर्थ्यवान असूनही केवळ भगवंताचे अधिष्ठान नसल्याने भलेभले गाळपटले, तिथे तुम्हाआम्हा सामान्यांची काय गत? असो. सध्या इतकेच!