टिप्पिकल मराठी असल्याचा सार्थ अभिमान !
Dear Sir, जुन्या, अल्हाददायी, अलवार मनाला हात घालणारे अनेक प्रसंग, अनेक आठवणी आपल्याला आठवतात.. आईचा पदर, दारातलं तुळशी वृंदावन, आजीनं आडाशेजारी घातलेली अंघोळ आणि बरंच काही... खरंतर या गोष्टी तुम्हालाही आठवतातच ना.... विचारांध्ये कितीही Larger picture आणलं तरीही जुन्या आठवणींमध्ये काही माणसं रमतातच ना... मला यात कोणतीही typical middle-class Maharashtrian mentality वगैरे वाटत नाही... बंगाली माणूसही त्याच्या भाषेत हे लिहितो, तसंच अमेरिकनही त्याच्या जुन्या आठवणींची उजळणी करतो... एखाद्याला त्यात त्याचं जगणं हरवलं आहे असं वाटलं तर बिघडलं कुठं...??? हे सगळं लिहिण्याचं कारण 2010 साली माझ्या एका मराठीच बॉसने मला 'आईचा पदर, दारातलं तुळशी वृंदावन, आजीनं आडाशेजारी घातलेली अंघोळ' यावर फार वाईट comment दिली आणि ही टिप्पीकल मराठी मेंटॅलिटी असल्याचं म्हंटलं, इतकंच नाही तर त्यांनी त्यावेळी मृणाल कुलकर्णी कशी अजूनही ऑडी गाडीच घेऊन फिरते असं म्हणत तिचाही उद्धार केला होता.... त्यावर मात्र मी भडकले आणि त्यांचीच बिनपाण्यानं काढली. सिचन तेंडुलकर, माधुरी दीक्षितचं उदाहरण दिलं आणि मग मेलद्वारेस...