पोस्ट्स

एप्रिल, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्वामी जेंव्हा घरी येतात

  अक्कलकोटहून श्री स्वामी समर्थांच्या पादुका मुंबईत आल्या आहेत हे कळताच लगबग सुरू होते ती त्या घरी याव्यात यासाठीची.... आणि खरंच त्या गेल्यावर्षीही आल्या आणि या ही वर्षी आल्या. आणि मन प्रसन्न करून गेल्या. यावर्षअनेकांचे सकारात्मक अनुभव फारचबोलके होते.. माझ्यासकअनेकांचे पेंडिंगअसलेली कामं मार्गी लागली... जी कामं आता देवजाणे कधी मार्गी लागतील असं वाटून सोडून दिलेली.. त्याच कामांचे आज अनाहूतपणे फोन आले आणि अनेक वर्षांचे अडकलेले पैसे मिळणार असं सांगितलं, तर कोणाचे पेंडिंग कामं मार्गी लागली, तर कोणाचे प्रतिक्षा यादीतले नाव पुढे सरकले.  आज खरच कोण भाग्योदय माहिती नाही. पण जेंव्हा स्वामी घरी येतात, तेंव्हा ते केवळ सकारात्मक ऊर्जाच नव्हे, तर आम्हासर्वसामान्यांनाही कााहीतरी देऊनच जातात... फक्त आपली सगळी कवाडं खुली हवीत. स्वामी रित्या हाती येत नाहीत आणि रित्या हाती जात नाहीत. त्यामुळे ते देतातच. खऱ्या अर्थाने देणारे ते एकटे असले तरी आमीच समजण्यात दुबळेपणा करतो, म्हणूनच म्हंटलं ना, 'देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी'.